Samarth Bharat Vyaspeeth

प्रकल्प पुनर्निर्माण पुनर्निर्माणाचे उत्तरदायित्व

ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ यांनी महिला कचरावेचक, कचऱ्याचे वर्गीकरण करून उदरनिर्वाहासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या व्यक्तींच्या पुनर्वसनाचा अभिनव उपक्रम कार्यान्वित केला आहे. यापैकी अनेक महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आर्थिक असुरक्षितता, आरोग्य समस्या आणि सामाजिक कलंक यासह महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागतो. 

कचरावेचक व सफाईसेवक केवळ चतुर्थश्रेणी कामगार राहिले आहेत. यापलिकडे त्यांच्या जगण्याच्या व्याख्येत काहीही बदल झाला नाही. सगळे पुर्नप्रक्रिया करणारे उदयोजक व तथाकथीत भंगारवाले करोडपती झाले पण सफाईकामगार व कचरावेचकांचे पुनर्निर्माण ख-या अर्थाने झालेच नाही.

सिग्नल शाळा नव्या युगाचे पसायदान

ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ यांनी ठाण्यातील तीन हात नाका पुलाखाली सिग्नल शाळा हा अभिनव उपक्रम सुरु केला. जवळपास वीस ते बावीस वर्षांपासून सिग्नलवर पुलाखाली विस्तापित आयुष्य जगत असलेल्या कुटूंबातील 46 मुले आज मुख्य धारेतील शिक्षण घेत आहेत.

पिढ्यान्पिढ्यावर केला जाणारा सामाजिक अन्याय आहे. मूळात शळाबाह्य मूलांचा प्रश्नच मान्य करायचा नाही म्हणजे सोडवण्याची जबाबदारीच येत नाही या वृत्तीने याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे. आज सिग्नल शाळा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू घेऊन उभी आहे.

जग बदलण्याचे स्वप्न पहाणाऱ्या कल्पनांचा सेतु अर्थात समर्थ भारत व्यासपीठ

समर्थ भारत व्यासपीठाचे पाच प्रकल्प आज ठाणे शहरात सुरु आहेत हे सगळेच प्रकल्प ठाणे महानगरपालिकेशी संलग्न आहेत, सामाजिक संस्था म्हणून वेगळी चूल न मांडता लोकशाही व्यवस्थेचे अस्तित्व ठसठशीतपणे मान्य करणे आणि आहे त्या व्यवस्थेला अधिक रचनात्मक रूप देण्याचे काम समर्थ भारत व्यासपीठ करत आहे.
शासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी देखील आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यस्त आहेत. चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता व वेळ आज त्यांच्याकडे नाही. 

10 +

कचरावेचक महिलांचे सक्षमीकरण

10 +

भिक्षेकरी मुलांना मुख्य शिक्षण धारेत आणले

0 टन +

सुका कचरा महिन्याभरात जमा

10000 +

घरांचा सहभाग

आता पर्यंत काय कामं झाले आहेत

गेली बारा वर्षे समर्थ भारत व्यासपीठ हि संस्था भारतातील मुंबई नजिक असलेल्या ठाणे शहरात काम करीत आहे.
सिग्नल शाळेच्या माध्यमातून भीक्षेकरी मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा पॅटर्न संस्थेने उभा केला, अकुशल नाका कामगारांना कौशल्याधारित करण्यासाठीचा नाका शाळा संस्थेने सुरू केला, ठाणे शहरातील वार्षिक ३ हजार टन हरित कचऱ्यावर प्रक्रिया करून कोळसा तयार केला जात आहे, वर्षाकाठी २ हजार टन निर्माल्यावर प्रक्रिया आज केली जात आहे.
आपल्या ५० बचतगटांच्या माध्यमातून ५०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्य आणण्याचे काम संस्था करीत आहे.

Documentary

Our Supporters

They Need Your Help!

The children of Signal Shala are striving to build a better future through education and skill development. Despite facing many challenges, they are determined to learn and grow, whether it’s through vocational training, language skills, or extracurricular activities.  However, they need your support to continue their journey. Your contribution can help provide them with the resources, opportunities, and guidance they need to succeed.
Join us in making a difference in their lives and helping them achieve their dreams!